सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 विश्लेषण

मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त

डिजिटल पुणे    02-06-2026 12:04:17

परभणी : महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्यापूर्वीच मान्सूनपूर्व पावसाने अनेक जिल्ह्यांत हाहाकार माजवला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विविध भागांत जोरदार पाऊस, वादळी वारे, गारपीट आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीपिके, फळबागा, जनावरे आणि घरांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

परभणी जिल्ह्यातील इंदेवाडी येथे वादळी वाऱ्यानंतर घराची भिंत कोसळून 11 वर्षीय दिपाली नंदगे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगाखेड तालुक्यातील गौंडगाव येथे वीज कोसळल्याने शेतकरी किरण कराळे यांचा एक बैल आणि एक गाय दगावली. तसेच पोखरणी रेल्वे स्थानकावरील पत्र्याचे शेड उडून ओव्हरहेड वायरवर पडल्याची घटना घडली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात गारपीट आणि मुसळधार पावसामुळे केळी व जांभूळ बागांचे मोठे नुकसान झाले. चिखली गावातील शेतकरी दिनकर लाड यांनी घेतलेले केळी आणि पांढऱ्या जांभळाचे पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाले. बाजारात चांगला भाव मिळण्याच्या अपेक्षेत असताना लाखोंचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, शेगाव आणि खामगाव तालुक्यांत चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे हजारो हेक्टरवरील केळी आणि संत्रा बागा जमीनदोस्त झाल्या. निर्यातीसाठी तयार असलेल्या केळी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातही वादळी वाऱ्याने केळीच्या शेकडो एकर बागा आडव्या झाल्या. अनेक घरांवरील पत्रे उडून गेली असून पोमलवाडी येथे घराची भिंत कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू केले असून शेतकऱ्यांकडून तातडीच्या मदतीची मागणी होत आहे.मान्सूनपूर्व पावसाच्या या तडाख्यामुळे राज्यातील अनेक भागांत शेतीचे मोठे नुकसान झाले असून बळीराजासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे.


 Give Feedback



 जाहिराती