सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आमरण उपोषणासाठी बसलेल्या अभिजित दिपकेंवर महिलेकडून शाईफेक; पाचशे-पाचशे देऊन गुंडाना आंदोलनात घुसवलं जातंय, दिपकेंचा गंभीर आरोप
  • सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'
  • देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
  • देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
  • सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आजचा 21वा दिवस; मनोज जरांगेंकडून आंदोलनाला पाठिंबा देत केंद्र सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, विद्यार्थी महत्त्वाचे की मंत्री?
 DIGITAL PUNE NEWS

डिजिटल आवाज - कोल्हापूर मधील महापुराचे खरे अपराधी कोण?

अजिंक्य स्वामी    3280   25-07-2021 02:12:00

२०१९ पासून आपण कोल्हापूर/सांगली या पट्ट्यामध्ये पुराचा विळखा पहात आलो आहोत. निसर्गाच्या कृपेने २०२० साल पावसाच्या दृष्टीने कोल्हापूरला चांगले गेले. मुळातच कोल्हापूर/सांगलीचा हा भाग पहिला तर मोठ मोठ्या नद्यांचा व तलावांचा प्रदेश. कोल्हापुर मधील रंकाळा, कळंबा हे तलाव तर सर्वांना परिचितच आहेत, पण कधी काळी कोल्हापूर शहरामध्ये फिरंगाई , वरुणतीर्थ, लक्षतीर्थ, कपिलतीर्थ, कुंभारतळे, महारतळे, पद्माळे, सिद्धाळा, रंकाळा, कोटीतीर्थ, रावणेश्वर, कळंबा तलाव अशी तलावे होती. पण जसजसे शहर वाढू लागले तसे ती तळी बुजवून तिथे नागरी वस्ती झाली. त्यातील आता रंकाळा, कळंबा आणि कोटीतीर्थ हे तीन तलावच आता शिल्लक आहेत. 

तलावांबरोबरच जिल्ह्यामध्ये बारमाही वाहणाऱ्या नद्यांचे प्रमाणही खूप आहे. पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती करवीर तालुक्यातल्या चिखली गावातील प्रयाग संगमापासून सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि धामणी नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते. पंचगंगाला काळा ओढा, चंदूर ओढा, जयंती, तिळवणी ओढा, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार आदी ओढे मिळतात. पंचगंगा नदी पूढे जाऊन नृसिंहवाडी जवळ कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने कोल्हापूर/सांगली पट्ट्याने चांगली प्रगती केली आहे. शाहू महाराजांनी पूर्ण जिल्हा सुपीक करण्यासाठी राधानगरी सारखे आशिया मधले पहिले स्वयंचालित दरवाजे असणारे धरण बांधले. ११२ वर्षे होऊन गेली तरी या धरणाला अजिबात गळती नाही आहे. आजही हे धरण १००% भरले तरी पाणी थांबवून ठेवू शकते. गळती असती तर धरण १००% भरायच्या आधीच पाणी सोडून द्यावे लागते नाहीतर धरण फुटण्याचा धोका असतो. या धरणाने बराच भाग जलसिंचनाखाली आणला आहे.