सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : सिंहगड रस्ता परिसरातील वाहतूक विस्कळित;चिखल अन् खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त; उपाययोजनांची मागणी
  • आदित्य ठाकरेंचा मुंबईतील आंदोलनातून अभिजित दिपकेंना कॉल, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतलाच पाहिजे , दिपकेंचा निर्धार
  • गुजरात-आसाममध्ये पावसाचा तांडव; 872 गावे पाण्याखाली, लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत; IMD कडून रेड अलर्ट
  • : पालघरमध्ये पावसाचा हाहाकार, सूर्या आणि वैतरणा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; डहाणूमध्येही जनजीवन विस्कळीत
 जिल्हा

पालघरवर पावसाचा कहर! अनेक घरे जलमय; उत्तर कोकणात इतका मुसळधार पाऊस का पडतो? संशोधनातून उलगडलं कारण

डिजिटल पुणे    25-07-2026 12:46:21

पालघर : पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी-नाले दुथडी भरून वाहत असताना धामणी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने सूर्या नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे दाभाडी बेटावर भात लागवडीसाठी गेलेले दहा नागरिक तब्बल २४ तासांहून अधिक काळ अडकून पडले होते. एनडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त बचाव मोहिमेत त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

दरम्यान, डहाणू तालुक्यातील चिंचणी परिसरातील काजळपाडा, नागेश्वरी पाडा आणि कोसरे तलाव परिसरातील ८० ते ९० घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून मदतकार्य सुरू केले असून जिल्हाधिकाऱ्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी करून तातडीने पंचनामे आणि मदतीचे आदेश दिले आहेत.

पालघरमध्ये इतका पाऊस का पडतो?

उत्तर कोकण, विशेषतः पालघर जिल्ह्यात दरवर्षी होणाऱ्या अतिवृष्टीमागील शास्त्रीय कारण एका संशोधनातून समोर आले आहे. 'करंट सायन्स' या संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे बाष्पयुक्त वारे पालघर परिसरात एकत्र येतात. या वाऱ्यांच्या संगमामुळे वातावरणात कमी दाबाचा विशेष पट्टा तयार होतो आणि त्यातून प्रचंड पावसाळी ढगांची निर्मिती होते.

हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप, एस. भुते आणि के. एस. होसाळीकर यांनी केलेल्या संशोधनात २१ सप्टेंबर २०१६ रोजी डहाणू परिसरात झालेल्या विक्रमी पावसाचे विश्लेषण करण्यात आले आहे.

अतिवृष्टीची प्रमुख कारणे

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम.

वातावरणात तयार होणारा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा.

वाऱ्यांच्या धडकेमुळे उंचावर तयार होणारे पावसाळी ढग.

समुद्रातील चक्रीय हवामान प्रणालींमुळे निर्माण होणारी अनुकूल परिस्थिती.

या सर्व नैसर्गिक घटकांच्या एकत्रित परिणामामुळे पालघर आणि उत्तर कोकणात अनेकदा अल्पावधीत विक्रमी पाऊस पडतो आणि पूरस्थिती निर्माण होते.


 Give Feedback



 जाहिराती