सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 व्यक्ती विशेष

उद्धव ठाकरे मुंबईतील लँडस्कॅम घोटाळ्याचे मु्ख्य सुत्रधार; आशिष शेलारांचा खळबळजनक आरोप

डिजिटल पुणे    22-04-2025 14:44:45

मुंबई:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. दुसरीकडे मनसे आणि भाजपमध्येही वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू असताना आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी मुंबईतील भूंखंडांच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे  मुंबईच्या राजकीय वर्तुळात ठाकरे गट आणि भाजपमध्ये नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे हे मुंबईतील विविध भूखंडांवर होत असलेल्या कथित घोटाळ्यांचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप  आशिष शेलार यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांच्या विचारांमध्ये नेहमी ‘जमीन’ आणि ‘लँड स्कॅम’ हेच चालू असते,” अशी जहाल टीकाही  त्यांनी केली. गरवारे क्लबमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यशाळेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. आशिष शेलार म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांनी नवीन काही बोलायचं सोडून दिलं आहे. आता ते  सतत अमुक जमीन अदानीला दिली, तमुक जमीन अंबानीला दिली अशा आरोपांमध्येच अडकून पडले आहेत.”

काही दिवसांपूर्वी त्यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक संबंधांबाबत वक्तव्य करत ‘वैयक्तिक मैत्री बाजूला ठेवली आहे’ असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही थेट शब्दांचा वार केला आहे. आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुम्ची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे. वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅं समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आशिष शेलार म्हणाले, 25 वर्षे मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता होती. पण आज मुंबईतील एक चौरस फूट क्षेत्रफळाची जागेलासाठीही लाखो रुपये मोजावे लागतात. महापालिकेत उद्धव ठाकरेंची सत्ता असताना त्यांनी बिल्डरांना 1 कोटी चौरस फूट क्षेत्र फुकटात दिले होते. ते आम्हाला काय जाब विचारतील, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. वक्फ सुधारणा कायद्याबाबत बोलताना आशिष शेलार म्हणाले, ‘उद्धव ठाकरेंकडून खोटी माहिती पसरवली जात आहे. तुमची संपत्ती, मशिदी, स्मशानभूमी घेणार, असे खोटे पसरवले जात आहे. पण आपल्या देशात कायदा असल्याने तसे करता येणार नाही. वक्फ विधेयक हे गरीब मुस्लिमांच्या फायद्यासाठी करण्यात आले आहे.

वक्फ बोर्डाने घेतलेल्या जमिनी पुन्हा देण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. मु्लिमांनीदेखील पुढे येऊन त्यांचे अभिनंदन केलं आहे. जे मुस्लिम समाजाला वोट बॅंक समजतात, तेच या कायद्याला विरोध करत आहे. पण आम्ही यांचे पितळ उघडे पाडणार आहोत. कायदा संमत झाला आहे. आता आम्ही नियम बनवणार आहोत. त्यानंतर गरीब मुस्लिमांना कसा फायदा होणार, यासाठीही आम्ही प्रयत्न करत आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे.


 Give Feedback



 जाहिराती