पुणे : पहलगाम मधील निर्घृण दहशतवादी हल्लयानंतर "काश्मिरी नागरिकांना धडा शिकवा, तेथे पर्यटनाला जाऊ नका" अश्या प्रकारची आवई सोशल मीडिया वर मोठ्या प्रमाणावर उठली आहे.निश्चितच अतिरेक्यांनी धर्म विचारून हल्ला केला हे निर्विवाद आहे व त्यांना काही स्थानिकांची साथ होती हे देखील आता सुरक्षा दलाच्या कारवाई वरून स्पष्ट होत आहे, मात्र हा धागा पकडून काश्मीर वर बहिष्काराची भाषा करणे म्हणजे अतिरेक्यांचा हेतू सफल झाल्यासारखे होईल असे स्पष्ट मत भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.
ह्या निर्घृण आणि भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी यांनी धीरोदात्त पणे ह्या भयानक प्रसंगाला तोंड दिले असे तेथील डी सी पी फारुख यांनी सांगितले.तेथील डॉ. नासीर यांनी तिसऱ्याच दिवशी आसावरी व कुणाल गनबोटे यांना संपर्क केला व आधार कार्ड पाठवा असे सांगितले.त्या वेळेसची कुटुंबियांची मनःस्थिती कोणावर विश्वास ठेवावा अशी नव्हती, म्हणून आसावरी ने मला फोन करून त्यांचा नंबर दिला.

मी श्रीनगर मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग चे कोर्स आयोजित करणारी माझी भाची दीपाली भातखंडे हिला संपर्क करून तिचे तेथील सहकारी स्वयंसेवक सलीम मलिक यांच्याशी संपर्क केला व त्यांना तेथील वस्तुस्थितीची माहिती घेण्यास सांगितलं. सलीम ने तातडीने पहलगाम ला जाण्याची तयारी दर्शविली व तेथील डॉ. नासीर व त्यांच्या सत्यतेची हमी दिली. ह्यानंतर डॉ. नासीर आणि त्यांच्या टीम ने मृत्यूच्या दाखल्याची सर्व प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण केली व दोन तीन वेळा नावामधील चुका ही दुरुस्त करून दिल्या.डॉ. नासीर यांचे आभार मानण्यासाठी त्यांना फोन केला असता त्यांनी खालील भावना व्यक्त केल्या व मला काश्मीर ला येण्याचे व त्यांच्या घरीच राहण्याचे निमंत्रण दिले.
My name is Dr naseer...BMO SALLAR...MY CHIEF MEDICAL OFFICER IS DR KHALID PARVEZ..HE IS CMO ANG AND OUR BOSS IS DR ABID RASHEED SECRETARY HEALTH...I WOULD LIKE TO SAY WHOLE TEAM WORKED IN CO ORDINATION AND UNDER THE GUIDANCE OF OUR WORTHY SECRETARY....IT IS OUR DUTY TO HELP...WHO SO EVER IT IS...I AM HIGHLY THANKFUL TO YOU THAT YOU RECOGNIZED OUR WORK..AT THE SAME TIME VERY UPSET BCOZ OF THIS SAD HAPPENING...MAY GOD BLESS US ALL AND MAKE OUR COUNTRY TO SHINE DAY BY DAY....Regards.
त्याचप्रमाणे तेथील डी एस पी फारुख व पोलीस निरीक्षक रियाज यांनी देखील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबियांशी संपर्क साधून दोघांचे साहित्य कुरियर केले. (यात सोन्याच्या अंगठ्यांसह सर्व काही होतं ) मात्र श्री. जगदाळे यांचा चष्मा व श्री. गनबोटे यांचा हातातील कडा मिसिंग होता. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता " आम्ही त्या वस्तूंचा शोध घेऊ व सर्वत्र पथक पाठवू असे सांगतानाच जे झाले ते दुःखद आहे आणि आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांप्रमाणे एकूणएक वस्तू कुटुंबियांना परत करू असेही त्यांनी सांगितले.
एकूण काय तर तेथे अनेक मदतीचे हात ही पुढे आले आणि त्यांनी झाल्या प्रकाराबाबत दुःख व्यक्त करताना त्याचा निषेध देखील केला.काश्मीर मधील हल्ल्याचा हेतूच हा आहे की काश्मिरींना देशाच्या मुख्य प्रवाहापासून तोडणे व तेथील विकासाला खोडा घालणे. त्यामुळे तेथील चांगल्या नागरिकांना पाठबळ देण्यासाठी पर्यटन न थांबवता ते असेच सुरु ठेवणे हेच देश हिताचे ठरेल.
मला आलेल्या अनुभवावरून "काश्मिरीयत और इन्सानियत दोनो अभी जिंदा हैं असेच म्हणावंसं वाटतं"....संदीप खर्डेकर