सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांच्या स्मारकाच्या जागेसाठी निवड करा

डिजिटल पुणे    26-11-2025 11:11:19

मुंबई : हिंदी पत्रकारितेचे पितामह संपादकाचार्य बाबूराव विष्णूराव पराडकर यांचे मौजे पराड (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने पुढील सात-आठ दिवसांत जागा निवडीचा निर्णय घ्यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

याबाबत मंत्री ॲड. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभिषण चवरे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण तर दूरदृश्यप्रणालीद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह सामान्य प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभागाचे अधिकारी आणि काशी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राममोहन पाठक उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, पराडकर हे निर्भिड, समाजाभिमुख पत्रकारितेचे प्रेरणास्थान असून आजही हिंदी पत्रकारितेच्या इतिहासात त्यांचे नाव सर्वोच्च मानले जाते. काशी येथे त्यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पराडकर हे कोकणातले सुपुत्र असल्याने त्यांचे स्मारक तसेच त्यांचे जीवनदर्शन लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. यादृष्टीन त्यांच्या मूळगावी स्मारक उभारण्यात येत आहे. स्मारक उभारणीसाठी शासनाने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या नियुक्त समितीने स्मारकासाठी जागा निश्चिती व मोजणी करून त्या ठिकाणी स्मारकाबरोबरच गावकऱ्यांच्या अनुषंगीक मागणीचा विचार करावा. याकामी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांनी सात-आठ दिवसात निर्णय घेऊन तत्काळ अहवाल पाठवावा, असे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती