नाशिक : नाशिक शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून, लग्नसोहळा सुरू होण्याच्या काही तास आधीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गंगापूर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मयत वधू मुंबईतील दादर–माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ वास्तव्यास होत्या. रविवारी सकाळी त्यांचा विवाह गंगापूर गावाजवळील एका आलिशान रिसॉर्टमध्ये पार पडणार होता. यासाठी वराकडील मंडळी मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाली होती आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.
लग्नाच्या मंगलाष्टका सुरू होण्यापूर्वीच काळाने घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना नाशिकमध्ये घडली आहे. विवाहसोहळा सुरू होण्याच्या काही तास आधीच नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. गंगापूर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत नववधू या मुंबईतील दादर–माटुंगा परिसरातील, रुपारेल कॉलेजजवळ वास्तव्यास होत्या. रविवारी सकाळी गंगापूर गावाजवळील एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा विवाह सोहळा पार पडणार होता. यासाठी वराकडील मंडळी मुंबईहून नाशिकमध्ये दाखल झाली होती. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती, मंडप सजला होता आणि आनंदाचे वातावरण होते.
नेमकं काय घडलं?
रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास नववधू रिसॉर्टमधील खोली क्रमांक 201 मध्ये नातेवाइकांसोबत असताना अचानक त्यांना चक्कर आली. काही क्षणांतच त्या बेशुद्ध अवस्थेत कोसळल्या. यामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरुजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
आनंदाचा सोहळा अंत्ययात्रेत बदलला
लग्नाचा मंडप सजलेला होता, हळदी-संगीताचा कार्यक्रम पार पडला होता. अवघ्या काही तासांत नववधू बोहल्यावर चढणार होती. मात्र मंगलाष्टक वाजण्यापूर्वीच या दुर्दैवी घटनेने संपूर्ण वातावरण शोकमय झाले. हातावर रंगलेली मेहंदी, लग्नाची साडी आणि अक्षतांची तयारी पाहून नातेवाइकांचे अश्रू अनावर झाले. जिथे आनंद, हशा आणि मंगलाष्टकांचे सूर घुमणार होते, त्याच ठिकाणाहून अंत्ययात्रेची तयारी करावी लागल्याने उपस्थितांचे मन सुन्न झाले.
अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेची नोंद सरकारवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. नववधूचे वडील ज्येष्ठ विधिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. ऐन लग्नाच्या दिवशी नववधूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने नाशिक शहरासह मुंबईतही शोक व्यक्त केला जात आहे.आनंदाचा क्षण एका क्षणात शोकात बदलणाऱ्या या घटनेने सर्वांच्याच मनाला चटका लावला आहे.