सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मतदानानंतर बोटावरील शाई पुसून बोगस मतदानाचा आरोप ;रूपाली चाकणकरांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; पुणे, मुंबईसह राज्यभरात खळबळ
  • मतदान करुन बाहेर पडताच राज ठाकरे संतापले, उद्वेगाने म्हणाले, 'सगळी सिस्टीम सत्ताधाऱ्यांसाठी काम करतेय'
  • : पुण्यात मतदान केंद्रावर गोंधळ! गुरुवार पेठेत मशीन बंद, उमेदवार आक्रमक, लोकशाहीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह?
  • “भाजपकडून पैसे वाटपाचे व्हिडीओ माझ्याकडे...” – प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप
  • : पिंपरी चिंचवड प्रभाग क्रमांक 13 मधील मतदान प्रक्रिया तब्बल पाऊण तास बंद
  • महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड; मुंबईमध्ये शिवसेना - भाजपची सत्ता येईल : दादा भुसे
  • गायब नाव, पैसे, दबाव... पिंपरी-चिंचवड मतदान केंद्रात गोंधळ, रोहितदादा पवारांचे संतप्त वक्तव्य
 राजकारण

बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार; राज ठाकरे संतापले, निवडणूक आयोगाचा खुलासा – पुन्हा मतदान शक्य नाही

डिजिटल पुणे    15-01-2026 15:38:19

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान करून परतलेल्या काही मतदारांच्या बोटावरील शाई पुसली जात असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. बोटावरील शाई पुसली गेली असली तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येणार नाही, असे आयोगाने ठामपणे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मतदाराने एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद मतदान यंत्रणा व मतदार यादीत घेतली जाते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही. उलट असा गैरप्रकार आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयोगाने दिला आहे.

शाईऐवजी मार्करचा वापर – आयोगाचा खुलासा

महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले की यंदा मतदानासाठी पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेन किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत 19 नोव्हेंबर 2011 आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले असून, 2012 पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मार्कर पेनचाच वापर केला जात आहे.या आदेशानुसार, मतदाराच्या नखावर तसेच नखाच्या वरच्या बाजूच्या त्वचेवर तीन ते चार वेळा घासून ठळकपणे मार्कर लावण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.या सूचनांचा उल्लेख मार्कर पेनवरही नमूद असल्याचे आयोगाने सांगितले आहे.

‘गैरकृत्य करू नये’ – आयोगाचे आवाहन

बोटावरील शाई किंवा मार्कर पुसण्याचा प्रयत्न करून संभ्रम निर्माण करणे हे गैरकृत्य असून, नागरिकांनी अशा प्रकारांना बळी पडू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दरम्यान, मुंबईतील विविध भागांमध्ये शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती