मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कद्दावर नेते अजित पवार यांचा आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सर्वात धडाडीचे नेते म्हणून प्रचलित असलेले आणि दिवसाची सुरुवात पहाटे करून अवघ्या आपल्या महाराष्ट्राला एक आदर्श घालून देणारे महाराष्ट्राचे दादा व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (28 जानेवारी) बारामतीमध्ये विमान अपघातात निधन झाले.आज सकाळी साधारण ८:४५ वाजता, मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या चार्टर्ड विमानाने बारामती विमानतळावर लँडिंग करताना नियंत्रण हरवले आणि अपघात झाला. या दुर्घटनेत विमानातील सर्व सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे, ज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे.
अजित पवार यांच्यासह विमानात त्यांच्या सुरक्षा कर्मचारी, थोडक्यात सहकारी आणि पायलटही होते. अपघातानंतर विमानाचे अवशेष तुकडे झालेले दिसून आले आहेत आणि घटनास्थळी अवघ्या प्रशासनाने बचाव व तपास सुरू केला आहे.
विमान लाँडिंग होत असतानाच अपघात
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.
दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त
अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चिलं गेलं आहे. राजांच्या राज्याच्या राजकारणामध्ये त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे. अपघातग्रस्त विमान पाहिल्यानंतर अनेकांना जागेवर अश्रु अनावर झाले.
अजित पवार हे महाराष्ट्रातील एक दिग्गज राजकीय नेते होते आणि त्यांनी राज्याच्या राजकारणात अनेक दशकांपासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे आणि विविध राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे.या अपघाताचे कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही, परंतु तपास सुरु असून विमान तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रण बाहेर गेले असण्याची प्राथमिक शक्यता दिसत आहे.