बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणाचा महत्त्वाचा स्तंभ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामतीत झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. गेल्या अनेक दशकांपासून कठोर प्रशासक, धडाडीचा नेता आणि मास लीडर म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचे निधन राज्यभर मोठ्या दु:खाचा विषय ठरले आहे.
बारामती येथील गोजुबावी परिसरात लँडिंग दरम्यान त्यांचे विमान कोसळले आणि त्यामध्ये सहा जणांसह अजित पवार यांचा मृत्यू झाला. विमान कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट झाला, ज्यामुळे अपघाताचे दृश्य भयावह झाले.
अजित पवार यांचे पार्थिव बुधवारी बारामती वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. काल संध्याकाळी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात ठेवण्यात आले, जिथे शोकाकुल बारामतीकरांनी मोठ्या संख्येने हजर राहून त्यांना शेवटचा निरोप दिला.
आज गुरुवारी सकाळी त्यांच्या पार्थिवाला काटेवाडी येथील निवासस्थानातून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्ययात्रा घेऊन जाईल. सकाळी ९ वाजता काटेवाडी येथून अंत्ययात्रा सुरू होईल आणि ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शेवटचा निरोप दिला जाईल. त्यांच्या अंत्यविधीसाठी बारामती विमानतळावर पोलीस आणि NDRF पथक तैनात आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यासह अनेक मान्यवर बारामतीत उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र सरकारने अजित पवार यांच्या निधनानंतर तीन दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे.
बारामतीकर आणि संपूर्ण राज्यासाठी हे दु:खाचे दिवस आहेत, कारण ज्यांनी अनेक दशकांपासून राज्याच्या विकासात योगदान दिले, त्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याची वेळ आली आहे.