पुणे : पुणे शहरातील नऱ्हे परिसरातील मानाजीनगर येथे गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. आठवड्यातून एक ते दोन वेळा दीर्घकाळ वीज खंडित होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आज (दि.) सकाळी सुमारे ९ वाजल्यापासून वीजपुरवठा बंद असून तब्बल ६ ते ७ तास उलटूनही तो पूर्ववत झालेला नाही. संबंधित विभागाशी संपर्क साधला असता “एक तासात वीज येईल” असे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात अनेक तास वीजपुरवठा सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
मानाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर रहिवासी, नोकरदार वर्ग, रुग्णालयातील कर्मचारी, हॉटेल व्यावसायिक तसेच छोटे-मोठे उद्योगधंदे करणारे नागरिक राहतात. वारंवार होणाऱ्या वीज खंडितमुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे.
या समस्येमुळे व्यवसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून रुग्णसेवेलाही अडथळे निर्माण होत आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
वारंवार एकाच भागा मधे गेली वर्षभर सतत वीज खंडित होत आहे .प्रशासना कडून तात्पुरती दुरस्ती केली जाते पण कायम स्वरूपी उपाय योजना केली जात नाही .तरी प्रशासनाने कायम स्वरूपी उपसा योजना करावी अशा येंथील स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत
“वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत,” अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
#electricitycut #electricitysupply #msebpune #narhe #msebpower