सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी : रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको : युगेंद्र पवार
  • अजितदादांच्या मनासारखं राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं असतं तर 2029 च्या निवडणुकीत दादा मुख्यमंत्री झाले असते: रोहित पवार
  • शरद पवारांना मतदान करायचं होतं, पण एक्स्प्रेस वे बंद, हेलिकॉप्टरने येणंही शक्य नव्हतं: सुप्रिया सुळे
 जिल्हा

उरण तालुक्यातील पाणथळीचे अस्तित्व धोक्यात ;निसर्गप्रेमी, पर्यावरणवाद्यांनी केली चिंता व्यक्त

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    27-04-2026 10:59:49

उरण : रायगड जिल्ह्यातील उरण तालुका निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला तालुका आहे. तिसऱ्या मुंबईचा महत्वाचा परिसर असल्यामुळे येथे विविध औद्योगिकीकरण, शहरीकरण मोठया प्रमाणात सुरु आहे. अनेक ठिकाणी वृक्षतोड, मातीचा भराव करणे, झाडे वृक्ष वेली लावण्याकडे दुर्लक्ष करणे आदी विविध कारणांनी उरण तालुक्यातील पाणथळीची संख्या घटू लागल्याने दरवर्षी या परिसरात येणाऱ्या विविध प्रजातींच्या हजारो पक्ष्यांच्या संख्येत घट झाल्याची खंत उरण मधील निसर्गप्रेमी,पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

उरणचे खाडी किनारे व पाणथळीवर फ्लेमिंगो उतरत होते. मात्र, येथील पाणथळीवर होणारा मातीच्या भरावामुळे पाणथळी जवळपास नष्ट झाल्या आहेत. या कारणांमुळे पक्षी अन्नाच्या शोधात परिसरातील छोट्या पाणथळीवर येऊ लागले आहेत. उरण परिसरात साधारणपणे ऑक्टोबरअखेरपर्यंत अनेक जातींचे पक्षी येथील पाणथळीवर उतरतात. त्यात जेएनपीए बंदर परिसर पाणजे, फुंडे, जासई व करळ आदी भागांतील पाणथळीवर दरवर्षी पक्षी उतरतातं. पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी असते. स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांचे ठिकाण असलेल्या प्रमुख पाणथळ जागा भराव टाकून गाडल्या जात आहेत. आंतरभरतीचे प्रवाह पद्धतशीरपणे नष्ट केले जात आहेत.त्यामुळे विविध सजीव सृष्टी पशु पक्षी यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

'बीएनएचएस'ने सूचीबद्ध केलेल्या सहा प्रमुख पाणथळ जागांपैकी बेलपाडा येथील एक जेएनपीएला भाडेपट्ट्यावर देण्यात आली होती व भेंडखळ आणि पाणथळ जागा 'एनएमआयआयए' विकण्यात आल्या आहेत.उरण मधील विविध ठिकाणी असलेल्या पाण थळ चे वेळीच संरक्षण व संवर्धन करण्यात यावे अशी मागणी निसर्गप्रेमी व पर्यावरण वाद्यांनी केली आहे. अन्यथा याचा विपरीत परिणाम निसर्ग चक्रावर, पर्यावरणावर होणार असल्याची चिंता निसर्गप्रेमी, पर्यावरण वाद्यांनी व्यक्त केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती