सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात संपन्न...

डिजिटल पुणे    26-02-2025 12:18:07

इचलकरंजी :  अरुण विद्यामंदिर व संग्राम बालवाडीचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावर्षी "शिव छत्रपती जागर आणि सांस्कृतिक" या विषयावर कार्यक्रम पार पडला.

विद्यार्थ्यांनी भावसाक्षरता, वैज्ञानिक दृष्टिकोन, वाहन विवेक, राष्ट्रीय जबाबदारी, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता या समाजमन घडवणाऱ्या विषयावर मुलां मुलीनी सुंदर सादरीकरण केले. स्नेहसंमेलन केवळ नाट्य, नृत्य यांचा अविष्कार न राहता ते विचारांचे संमेलन बनले, हे संमेलन अंतर्मुख करणारे होते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात केले व संस्थेस भविष्यात आमच्या कडुन सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन दिले 

 

सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महेश कुगावकर अध्यक्ष वीर माहेश्वरी समाज पुणे, श्रीकांत स्वामी उद्योगपती लातूर, श्री जगदीश स्वामी अध्यक्ष नर्मदा ट्रॅव्हल्स ग्रुप लातूर, माननीय अँड सौ अलका स्वामी माजी नगराध्यक्षा इचलकरंजी नगरपालिका, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, माजी नगरसेवक दिलीप मुथा, युवराज माळी, विजय गलगले धनराज खंडेलवाल सुनील तोडकर, विश्वनाथ मेटे चंद्रकांत बडवे राहुल जानवेकर कुमार माळी सुवर्णा स्वामी बाबासो कितुरे नागेश पाटील उमाकांत दाभोळे सारिका बांगड, पुष्पा लड्डा, राजाराम तोडकर,अरुण बंडगर, अविनाश वेदांते, युवराज शहा,मारुती वीर, रवी माळी, सचिन देशमाने, शिवम  केसरवाणी, सलीम शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संग्राम बालवाडी व अरुण विद्या मंदिरच्या पालकांसाठी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा व लिंबू चमचा स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अशोकराव स्वामींनी महिला पालकांना मुलांची काळजी घेण्याचे व अभ्यासाकडे लक्ष देण्याचे आवाहन या प्रसंगी केले.

 

 

कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या महिला पालकांसाठी पाककला स्पर्धा व लिंबू-चमचा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. विजेत्या महिलांना सन्मानचिन्ह व बक्षिसे प्रदान करण्यात आली.संस्थेचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांनी महिला पालकांना मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचे व त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रेरणा मिळाली.


 Give Feedback



 जाहिराती