सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 शहर

तुकाराम बीज सोहळ्यापूर्वी वारकऱ्यांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय!

डिजिटल पुणे    15-03-2025 14:25:56

पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. वारकऱ्यांनी इंद्रायणी नदीचे पाणी पिऊ नये किंवा वापरू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहे.

तुकाराम बीज सोहळ्यासाठी लाखो भाविक देहूत

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आजच्या दिवशी सदेह वैकुंठ गमन केले होते, त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. या पवित्र सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी देहूत दाखल होतात.परंपरेनुसार, हे वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करून पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

GBS आजारामुळे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

GBS हा दुषित पाण्यामुळे पसरणारा गंभीर आजार असल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहेत. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास व वापरण्यास मनाई केली आहे. वारकऱ्यांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

पुण्यात GBS ने थैमान घातल्याचे दिसून आले. पुण्यात सर्वाधिक याचे रुग्ण आढळले. तर, काही जणांचा यामुळे मृत्यू देखील झालाय. या आजारामागील प्रमुख कारण हे दूषित पाणी ठरले, त्यामुळे प्रशासनाने वारकऱ्यांसाठी हा महत्वाचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती