सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अखेर युद्ध थांबलं, भारत-पाकिस्तान दोन्ही देशांकडून युद्धबंदीला संमती!
  • पाकिस्तान हादरला! उपपंतप्रधान इशाक बॅकफूटवर म्हणाले, “भारत थांबला तर आम्हीही मागे हटू”
  • भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
  • पाकिस्तानच्या गोळीबारात जम्मू काश्मीरचे आयुक्त राजकुमार थापांचा मृत्यू; दोन कर्मचारी गंभीर जखमी
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग १)

डिजिटल पुणे    28-04-2025 10:36:54

अनुमान किंवा कल्पना निरसन (भाग १)
 
जे पिंडी तेचि ब्रह्मांडी | ऐसी बोलावयाची प्रौढी | हे वचन घडीने घडी | तत्वज्ञ बोलती ||९/५/२||
 
तत्त्वज्ञानी लोक जे पिंडी तेच ब्रह्मांडी असे बोलत असतात जणू असे बोलण्याचा प्रघात पडला आहे.
 
शिष्य म्हणतात की असे बोलणे काही मनाला पटत नाही. हे बघायला जावे तर नुसताच गोंधळ उडतो. शास्त्रात वर्णन केलेली पिंड ब्रह्मांडाची रचना व त्यांचा व्यवहार दोन्ही प्रत्यक्षात कसोटीला उतरत नाही. हे सांगण्यासाठी पुढील वर्णन समर्थ करतात. पिंडाचे चार देह (स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण), ब्रह्मांडाचे चार देह (विराट, हिरण्य, अव्याकृत, व मूळप्रकृती) यांचा अनुभव प्रत्यक्ष कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. हे वर्णन काल्पनिक वाटते. कसे ते पहा – पिंडात जसे अंत:करण तसे ब्रह्मांडाचे अंत:करण विष्णू आहे. पिंडात जसे मन आहे तसे ब्रह्मांडात चंद्र आहे. पिंडात जशी बुद्धी तसा ब्रह्मांडात ब्रह्मदेव आहे. पिंडात जसे चित्त तसे ब्रह्मांडात नारायण आहे. पिंडात जसा अहंकार तसा ब्रह्मांडात रुद्र आहे.
 
यावर शंका येते की विष्णूचे अंत:करण कोणते ? चंद्राचे मन कसे आहे ? ब्रह्मदेवाच्या बुद्धीचे लक्षण काय आहे ? नारायणाचे चित्त कसे असते ? रुद्राचा अहंकार कसा आहे ? याची उत्तरे सद्गुरूंनी द्यावी. सिंहासमोर जसे कुत्र्याची किमंत काहीच नसते तसे प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या निश्चयात्मक ज्ञानापुढे अनुमानाची किंमत नगण्य असते. खऱ्यासमोर खोटे प्रमाण कसे होईल ? समर्थ अनुभवाला महत्व देतात. प्रचीतीचे ध्यानात येण्यास खरा पारखी पाहिजे. नीट परीक्षा केली म्हणजे खरे काय आहे याचा निश्चय करता येतो. अन्यथा संशयजाळात माणूस अडकून बसतो.
 
हा विषय समजून सांगताना एक तर जे अनुभवाला आले आहे ते शास्त्रात असले पाहिजे किंवा जे शास्त्रात लिहिले आहे त्याचा अनुभव आलेला पाहिजे. कुत्रे ओरडलेले ऐकवत नाही तसे नुसते कोरडे शब्दज्ञान उपयोगाचे नाही. आंधळ्या माणसाच्या समुहात एका डोळस माणसाचे कोणी ऐकत नाही तसे स्वानुभवाचे डोळे नाहीत तेथे स्वरूपाबद्दल सगळा अंधार आढळून येतो. देहबुद्धी असलेली माणसे स्वरूपाबाबत आंधळीच असतात. त्यांना स्वरूप वर्णन समजणे, पटणे अवघडच असते.
 
देहबुद्धी असलेली माणसे डोंबकावळ्या सारखी असतात ते दृश्याची घाण चिवडत बसतात. दुध पाणी मिश्रणाऐवजी घाण मिळून त्याचा गोळा करून समोर ठेवला तर त्यात योग्य निवड करण्यासाठी राजहंसाची गरज नाही. त्यासाठी डोंबकावळे कुशल असतात. पिंडाप्रमाणे ब्रह्मांडाची रचना आहे अशी कल्पना करून तसे लोक नुसते बोलून दाखवतात त्याचा पुरावा कोणी देत नाही. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी हा सगळा अनुमानाचा खेळ आहे. चांगल्याने त्यात शिरू नये. चोरांनी त्यात संचार करावा. आपण ज्या देवांना मानतो तेही काल्पनिक आहेत. त्यांचे अस्तित्व मानले तर कोणते प्रश्न निर्माण होतात ते पुढील लेखात बघू.
 
कथाव्यास/प्रवचनकार/लेखक : श्री. दामोदर रामदासी पुणे. (रामदासी मठ परंपरा, नवगणराजुरी, जिल्हा बीड)


 Give Feedback



 जाहिराती