सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाका…; असदुद्दीन ओवेसींची मागणी

डिजिटल पुणे    28-04-2025 15:58:32

छत्रपती संभाजीनगर:  जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या ग्रे लिस्टमध्ये टाकावे, तरच त्यांना समजेल.”अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ISISI असो वा पाकिस्तानातील इतर दहशतवादी संघटना  भारतात हिंदू – मुस्लिम वाद व्हावेत, काश्मीरमध्ये नॉन मुस्लिम येऊ शकत नाही, हे त्यांना दाखवायचे होते. पण  जे लोक जात धर्म विचारून मारहाण करतात, त्याची आम्ही निंदा करतो, असही ओवेसी यांनी म्हटल आहे.

असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, त्या काश्मिरी आदिलने हिंदू- मुस्लिम पहिलं नाही, जर कोणी हिंदू मुस्लिम करीत असेल तर ते चुकीच आहे. त्याची निंदा करतो. युद्ध करायचे की नाही, हे सरकारवर सोडा. सरकार काय करणार हे सरकार ठरवणार आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला सांगितले आहे. तुम्हाला काय करायचं करा, पण हा दहशतवाद कायमच संपवा. सरकारला त्यांचे काम करू द्या.

पाकिस्तानी नेते बिलावल भुट्टो यांच्या वक्तव्यांबाबत बोलताना ओवेसी म्हणाले की, बिलावल भुट्टो आताच राजनीतीमधे आले आहेत. दहशतवाद्यांनी त्यांच्या आईची गोळ्या घालून हत्या केली. ही गोष्ट त्यांना समजण्याची आवश्यकता आहे. बिलावल यांच्या आईला मारणारे दहशतवादी आणि आमच्या देशातील निष्पापानां मारणारे चांगले का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले, वैष्णोदेवीजवळ एक असे ठिकाण आहे जिथे गेल्या वर्षी जुलैमध्ये ६० पर्यटकांचा मृत्यू झाला होता. म्हणून, प्रतिबंधात्मक धोरणाचा विचार करणे आवश्यक आहे. सर्वपक्षीय बैठकीत संपूर्ण विरोधी पक्षाने सरकारला सांगितले की, तुम्ही कारवाई करा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ जेणेकरून मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि अशी घटना पुन्हा घडू नये. म्हणूनच आम्ही सरकारला पूर्ण पाठिंबा देत आहोत.

ते पुढे म्हणाले की, पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानात आहेत. त्यांना तिथून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर दहशतवाद्यांनी सीमा ओलांडली आणि पहलगाममध्ये येऊन दहशतवादी हल्ला केला. यापूर्वी, जेव्हा २६/११ चा मुंबईवर हल्ला झाला तेव्हा पाकिस्तानने आपला सहभाग नाकारला होता पण जेव्हा कसाब पकडला गेला तेव्हा त्यांना ते मान्य करावे लागले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार कोणती भूमिका घेते हे त्यांच्यावर अवलंबून आहे. दहशतवाद्यांना रोखण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटते.


 Give Feedback



 जाहिराती