सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 व्यक्ती विशेष

‘युद्ध करणे हा पर्याय नाही…’, ऑपरेशन सिंदूरनंतर राज ठाकरेंची मोदी आणि केंद्र सरकारवर टीका

डिजिटल पुणे    07-05-2025 18:09:58

मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हवाई हल्ला केला. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये बांधलेले 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केली. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “पहलगाममधील हल्ल्यानंतर मी पहिली पोस्ट केली होती. त्यांना (पाकिस्तानला) धडा शिकवणे आवश्यक होते. युद्ध हा हल्ला असा समानार्थी शब्द नाही. पाकिस्तान आधीच उद्ध्वस्त झालेला देश आहे. आतापर्यंत हल्ला करणाऱ्यांना आपण शोधू शकलो नाही. त्यांना शोधणे ही पहिली जबाबदारी आहे.”

जेव्हा मनसे प्रमुख राज ठाकरे यांना विचारण्यात आले की पाकिस्तानवरील हवाई हल्ल्याबद्दल त्यांचे काय मत आहे? त्यावर राज ठाकरे म्हणाले, “जेव्हा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात होते. तिथून ते बिहारला गेले. मॉक ड्रिलऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा, आपल्या देशाचे प्रश्न संपत नाहीत. तुम्ही कुठे युद्ध पुकारणार आहात?” या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

या हल्ल्यात दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही केला जात आहे. एकीकडे ‘ऑपरेशन सिंदूर’साठी देशभरातून भारतीय लष्कर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सरकारवर टीका करणारे राज ठाकरे आहेत.

९/११ नंतर अमेरिकेने युद्ध छेडले नाही

पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही, असे राज ठाकरे म्हणतात. पाकिस्तानला असा धडा शिकवणे आवश्यक होते, पण युद्ध करणे किंवा हवाई हल्ले करणे योग्य नाही. राज ठाकरे यांनी असा दावा केला आहे की जेव्हा अमेरिकेत ९/११ चा ट्विन टॉवर हल्ला झाला तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून काढले आणि त्यांना ठार मारले. यानंतर, युद्ध लढले गेले नाही कारण युद्ध हे दहशतवादाचे उत्तर नाही.

लोकांचे लक्ष विचलित करणे योग्य नाही

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सरकारने मॉक ड्रिलऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करावे. एवढेच नाही तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात गुप्तचर यंत्रणेत त्रुटी असल्याचा दावाही राज ठाकरे यांनी केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, जिथे हजारो पर्यटक नेहमीच येतात त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? ते म्हणाले की हवाई हल्ल्यांद्वारे किंवा युद्ध करून लोकांचे लक्ष विचलित करणे हा पर्याय नाही.

 


 Give Feedback



 जाहिराती