सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 जिल्हा

युद्ध परिस्थिती मध्ये सर्व कीर्तनकारानी देशा बरोबर राहावे - सुधाकर इंगळे महाराज

डिजिटल पुणे    09-05-2025 14:36:13

पुणे : सध्या भारत देश हा युद्धाच्या उंबरठयावर आहे. अशा संकट समयी सर्वांनी देशा बरोबर राहणं हे खूप महत्वाचे आहे. या प्रसंगी देश हितासाठी जो निर्णय घेतला असेल तो सर्वांनी आनंदाने स्वीकारून त्या निर्णया बरोबर राहिले पाहिजे. देश सुरक्षित असेल तरच आपण सुरक्षित राहू शकतो. राष्ट्रहित हेच स्वहित असल्यामुळे भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी सर्वाना सूचना देण्यात आल्या आहेत , की सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, महाराज यांनी आपापल्या कीर्तनातून सध्यस्तिथी व देशप्रेम या विषयी दररोज जागृती करावी. तसे प्रबोधन करावे कारण समाज मनातील श्रद्धा देशाकडे आणणे खूप गरजेचे आहे . 

 " धर्माचे पालन | करणे पाखांड खंडण ||"  या न्यायाने धर्म, देश सांभाळून जागर आवश्यक आहे. कीर्तन हे प्रबोधनाचे माध्यम आहे. त्याचा उपयोग देशासाठी करणे काळाची गरज आहे. महाराज व कीर्तनकार यांचेवर भाविकांचा असलेला विश्वास देश प्रेमामध्ये परिवर्तीत करावयाचा आहे. या माध्यमातून तरी अल्पसी देशसेवा करता येणार असल्याचे समाधान सुधाकर इंगळे महाराज यांनी ऑनलाईनने घेतलेल्या मंडळाच्या बैठकीत व्यक्त केले . शिवारायांच्या काळात स्वराज्य प्रेम व जागृती करताना कीर्तन हे माध्यम उपयोगी आले होते . सैनिक आपली जबाबदारी खूप चांगली पार पाडत आहेत. आपण ही या प्रसंगी देशा अंतरगत स्तिथी शांत राहावी या साठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. युद्ध परिस्थिती मध्ये देशातील नागरिक व सर्वांची मानसिकता स्थिर कराणे. अशा बिकट प्रसंगी आपण ही सर्वांनी देशहित जोपसलं पाहिजे. हा निर्णय सर्वांनी स्वीकारून कीर्तन व प्रवचन यातून जागृती सुरु केली आहे. महाराष्ट्र प्रत्येक जिल्हाध्यक्ष आपापल्या जिल्हा मध्ये बैठक घेऊन या विषयी नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. असे भाविक वारकरी मंडळाने एक पत्रक काढून जाहीर केले आहे .


 Give Feedback



 जाहिराती