सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • ब्लॅकआऊटवेळी हॉस्पिटलसोबत समन्वय यंत्रणा उभी करा. टार्गेट होऊ नये म्हणून लाईट बंद केले जातात, त्यामुळे पर्यायी विद्युत व्यवस्थेद्वारे यंत्रणा सुरू ठेवून, गडद रंगाचे पडदे अथवा गडद रंगाच्या काचा वापरून त्याचवेळी बाहेरून लाईट दिसणार नाही, अशी व्यवस्था करा.
  • पोलिस विभागाने नेहमीपेक्षा जास्त जागरूकता ठेवावी. देशद्रोही व्यक्तींच्या कारवाया वाढण्याची शक्यता पाहता अधिक कोंबिग ऑपरेशन करा आणि गस्त अधिक चोख करा.
  • प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांच्या सायबर सेलने समाजमाध्यमांवर देखरेख ठेवत पाकिस्तानला मदत करणारे हॅण्डल ओळखून त्यावर कारवाई करा. शत्रूला मदत करणारी अथवा चुकीची माहिती कुणी प्रसारित करीत असेल तर त्यावर कारवाई करा.
  • ब्लॅकआऊट म्हणजे काय आणि अशावेळी काय करावे, यांचे व्हिडिओ विद्यार्थी, नागरिकांपर्यंत पोहोचवा. व्यापक जनजागृती करा.
  • राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
  • भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला.
  • भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ
  • मुंबई-पुण्यात हाय अलर्ट जारी! नौदलाकडून मच्छिमारांना महत्वाच्या सूचना
  • चंदीगढमध्ये हवाई दल स्थानकाजवळ सायरन वाजवण्यात आले असून नागरिकांना घरात राहण्याचा आणि बाल्कनीपासून दूर राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
  • भारत-पाक संघर्षाचा शेअर बाजाराला दणका ! सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये; रिलायन्स, टाटा स्टॉक्सही घसरले
  • भारताशी पंगा घेणं अंगलट; पाकिस्ताननं असीम मुनीरलाच उचललं; लष्कर प्रमुखपदावरुन हटवलं? देशद्रोहाचा गुन्हाही दाखल ...
  • मुंबईच्या साकीनाका परिसरात संशयास्पद ड्रोनच्या घिरट्या, पोलीस सतर्क; कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात..
  • मोठी बातमी!! अखेर IPL स्पर्धा स्थगित; BCCI चा मोठा निर्णय
  • परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषदेतेतील ठळक मुद्दे पाकीस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्याचे आदेश भारताने सिंधू पाणी करारास स्थगिती अटारी वाघा बॅार्डर १ मे पर्यंत बंद
 DIGITAL PUNE NEWS

बारस अर्थात द्वादशी व्रताचे महात्म्य सांगणाऱ्या, द्वादशी क्षेत्र, भगवंत नगरी, बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत देवाचा आज प्रकटदिन

डिजिटल पुणे    09-05-2025 17:38:01

बार्शी :  अंबऋषी राजा हा श्री महाविष्णू भगवंताचा परमभक्त होता. त्याने पूर्वीचे पंकापूर, पंकतीर्थ, पुष्पावती नदीकाठी असलेल्या शांत ठिकाणी तपश्चर्येसाठी वास्तव्य केले. द्वादशीचे व्रत केले, दशमीच्या दिवशी एकभुक्त, एकदशी दिवशी निर्जल, द्वादशी दिवशी व्रताचे पारणे हा त्याचा नित्यक्रम होता. त्याच्या व्रताचा भंग करण्यासाठी इंद्राच्या विनंतीनुसार दुर्वास ऋषी हे मुद्दामहून द्वादशीच्या दिवशी बार्शीला आले. त्यांनी अंबऋषी राजाने अपमान केला असल्याचे सांगत कुसपट काढून क्रोधित होऊन, पुष्पवती नदीला पालथे होण्याचा व दहा जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. आजही बार्शीतील नदी जमिनीच्या खालून भूगर्भातून वाहते आहे.

 

 

भक्त अंबऋषी राजाने आपले आराध्य दैवत श्री भगवंताचा धावा केला. भगवंताने आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी प्रकट होऊन दुर्वासाच्या मागे आपले सुदर्शन चक्र सोडले. चुकीचे वागल्याने मोठे संकट मागे लागले याची जाणीव झालेले दुर्वास ऋषी यांना पळता भुई थोडी झाली. पळून पळून शेवटी त्यांनी श्री महादेव शंकराचा धावा केला. भक्ताच्या हाकेला धावून श्री शंकरांनी सुदर्शन चक्र शांत केले व त्यांनी आश्रयास आलेल्या दुर्वासला जीवदान दिले. परंतु साधू संतांच्या मुखातून पडलेल्या शब्दाला खरे होण्यासाठी स्वतः श्री भगवंतांनी दहा जन्म सोसण्याचे मान्य केले. भक्तासाठी स्वतः श्रीविष्णू भगवंतांनी आतापर्यंत मत्स्य, कुर्म, वराह, श्रीराम, श्रीकृष्ण, वामन, नृसिंह, परशुराम, बुद्ध असे नऊ जन्म भोगले आहेत, तर कल्की हा आणखी एक अवतार होणे बाकी आहे.


 Give Feedback



 जाहिराती