पुणे: वीर माहेश्वर जंगम संस्था ही नेहमीच आपल्या वेगवेगळ्या उपक्रमामुळे चर्चेत असते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनाच्या निमित्याने संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.गोष्ट आमच्या लग्नाची या विषयावरील निबंध स्पर्धेत अस्मिता जंगम (नेरळ) यांना प्रथम ,मिनल राणे(मुबंई) द्वितीय तर मृणालिनी हरकारे यांना तृतीय क्रमांक पटकावला आहे.तसेच अपूर्वा जंगम ,(माणगाव), पौर्णिमा स्वामी (पुणे),कविता जंगम(माणगाव),ज्योस्ना कोहचाले (चंद्रपूर),पुष्पा सदानशिव यांना उत्तेजणार्थ पारितोषिक मिळाले.
या स्पर्धेत पुणे ,सातारा,रायगड,नेरळ,मुबंई ,नांदेड,मानगाव,जयसिंगपूर ,चंद्रपूर, गुजरात इं भागातील महिलांनी सहभाग घेतला.अत्यंत सुदंर निबंध आले परिक्षाकांना देखील निकाल देताना खूप कसरत करावी लागली.यावेळी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष महेश कुगावकर यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचं आणि सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि जागतीक महिला दिनानिमित्त सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिल्या...