मुंबई : राज्यातील बहुप्रतीक्षीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकता आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. कारण राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं आहेत. याशिवाय आज किंवा उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्येच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरुवात केली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आयोगाची पत्रकार परिषद संपल्यानंतर तत्काळ राज्यात आचारसंहिता लागू होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तीन टप्प्यांत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची घोषणा मंगळवारी केली जाण्याची शक्यता वर्तविली जाते. यामुळे राज्यात आचारसंहिता लागू होईल.
राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यात होण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतीची निवडणूक पार पडणार आहे. 21 दिवसात निवडणूक प्रक्रिया पार पडताना तात्काळ दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. तर शेवटच्या टप्प्यात महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आज आहे. राज्य निवडणूक आयोग आज दुपारी पत्रकार परिषद घेणार असून, त्यात नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांची घोषणा होण्याची चिन्हं दिसत आहेत.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पत्रकार परिषद संपल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील या निवडणुका तीन टप्प्यांत पार पडण्याची शक्यता आहे.
पहिला टप्पा – 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती
दुसरा टप्पा – जिल्हा परिषद व पंचायत समित्या
तिसरा टप्पा – महापालिका निवडणुका
नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि पंचायत निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता असून, मंगळवारीच निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याची अपेक्षा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेणे बंधनकारक आहे.
या निवडणुकांमध्ये राज्यातील एकूण
289 नगरपालिका,
32 जिल्हा परिषदा,
331 पंचायत समित्या आणि
29 महानगरपालिका
यांचा समावेश असणार आहे.
राज्याचे लक्ष आता आजच्या दुपारच्या पत्रकार परिषदेकडे केंद्रित झाले आहे.