सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वाल्मीक कराड नसल्याची खंत वाटत असेल तर त्याच्यासोबत जाऊन बसा, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना टोला
  • जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
  • माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या
  • पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान केलं, नाशिकमध्ये बड्या डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भारतीय महिला कबड्डी संघाचे विश्वविजेतेपदाबद्दल अभिनंदन

डिजिटल पुणे    25-11-2025 14:50:52

मुंबई  : ढाका येथे झालेल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चायनीज तैपेइचा ३५-२८ असा पराभव करून भारतीय महिला कबड्डी संघाने विश्वविजेतेपद पटकावले. भारतीय महिला खेळाडूंनी चिकाटी, जिद्द आणि संघभावनेच्या जोरावर जगासमोर भारतीय स्त्रीशक्तीचे विराट सामर्थ्य अधोरेखित केले आहे. हा विजय केवळ क्रीडाक्षेत्रातील पराक्रम नसून देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय महिलांची विक्रमी कामगिरी नव्या भारताच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारी असून, त्यांच्या खिलाडूवृत्तीसह कठोर परिश्रमाला मी मनापासून सलाम करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी संघाचे अभिनंदन केले.

आपल्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, भारतीय महिला कबड्डी संघाने दाखवलेली जिद्द, तंत्र आणि संघभावना प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. संजू देवी आणि उपकर्णधार पुष्पा यांच्या निर्णायक चढायांमुळे अंतिम फेरीत भारताने आघाडी घेत विजयाला गवसणी घातली. प्रशिक्षक तेजस्विनी बाई यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने पुन्हा एकदा जागतिक कबड्डीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

गेल्या महिनाभरात भारतीय महिलांनी साध्य केलेल्या तीन विश्वविजयांचा विशेष उल्लेख करत उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, देशातील महिला क्रीडा क्षेत्र अभूतपूर्व उंची गाठत आहे. सर्वप्रथम महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून आयसीसी महिला विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारतीय अंध महिला क्रिकेट संघाने कोलंबोमध्ये झालेला पहिलाच अंध टी-२० विश्वचषक जिंकला आणि आता महिला कबड्डी विश्वचषकातही भारताने विजेतेपद पटकावले. फक्त महिनाभरात भारताच्या मुलींनी मिळवलेल्या या तीन विश्वविजयांनी संपूर्ण देशाची मान उंचावली आहे. भारतीय महिला क्रीडापटूंच्या कामगिरीचा हा सुवर्णकाळ सुरू झाला असून भारतीय महिलांचा विजय रथ कोणी रोखू शकत नाही. देशातील प्रत्येक मुलीसह खेळाडूंसाठी हा प्रेरणादायी क्षण असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी भारतीय महिला कबड्डी संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, सहाय्यक कर्मचारी तसेच खेळाडूंच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती