मुंबई : तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत.नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधुग्रामसाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीविरोधात राजकीय नेते, पर्यावरणप्रेमी आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांकडून आवाज उठू लागला आहे. या विरोधात अभिनेता सयाजी शिंदे यांनीही थेट आणि कठोर शब्दांत भूमिका मांडत, “ज्यांच्यासाठी झाडे तोडली जात आहेत, त्या साधू-संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का?” असा सवाल उपस्थित केला.तपोवनातील साधुग्राम प्रकल्पासाठी 1,150 एकरांवर भव्य परिसर उभारण्याची योजना असून, त्यासाठी जवळपास 1,800 झाडांची कत्तल सुरू असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे. या वृक्षतोडीविरोधात नाशिककर, पर्यावरण कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे.
तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करणार आहे. विशेष म्हणजे हा निषेध नोंदविण्या साठी सर्व कलाकार सहभागी होणार असून, वृक्षप्रेमी-नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे. तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबर ला सकाळी हा निषेध नोंदविण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत सजायी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली.
तपोवन परिसरात साधू-महंतांसाठी 1,150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1,800 झाडे तोडली जात आहेत. त्यावरु, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी आक्रमक झाले असून अभिनेता सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला. तसेच, ''साधू आले गेले काही फरक पडत नाही'' असेही त्यांनी म्हटले होते.
मनसेचा निषेध
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडूनही या वृक्षतोडीचा जाहीर निषेध करण्यात येणार असून, 6 डिसेंबरला तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे हा निषेध नोंदवला जाणार आहे. सर्व कलाकारांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनसेकडून करण्यात आले आहे.
सयाजी शिंदेंची स्पष्ट भूमिका
पत्रकार परिषदेत बोलताना सयाजी शिंदे म्हणाले,“झाडं हे आपली आई-बाप आहेत. आपण जगतो ते झाडांमुळेच. मग त्यांच्यावर कुणी हल्ला करत असेल तर आपण शांत बसायचं का?”“10 वर्षांच्या झाडांना तोडून त्यांच्या बदल्यात 10 झाडं लावायची कल्पना म्हणजे पोरांना मारायचं आणि आई-बापाला जिवंत ठेवायचं… हीच कल्पना चुकीची.”झाडाखाली तपश्चर्या करणाऱ्या ऋषी-मुनींचा उल्लेख करत त्यांनी साधू-संतांना बदनाम करण्याचा हेतू नसल्याचे स्पष्ट केले, पण “झाडं तोडणं हेच साधू-संतांना पटणार नाही” असेही सांगितले.दरम्यान, मंत्री नितेश राणे यांच्या पर्यावरणवाद्यांवरील वक्तव्याबद्दल विचारले असता, “मला त्याला उत्तर द्यायचं नाही” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.