सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटलांचं नाही, नरेंद्र मोदींचं नाव द्यायचंय, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
  • निवडणूक आयोगानं सांगितलं तर लाडक्या बहिणींचे पैसे 16 तारखेला देणार, अजित पवारांचं मोठं वक्तव्य
  • पुण्यात महिला उमेदवाराकडून खास महिलांसाठीचा जाहीरनामा प्रकाशित
  • गाडीच्या टपावर चढून चंद्रकांत पाटील यांनी केले भाषण, पुण्यातील प्रचार फेरी दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल
  • बारावीचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार;इयत्ता बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची हॉल तिकिटे ऑनलाईन पद्धतीने मिळणार ;संबंधित शाळा व ज्युनिअर कॉलेज यांनी हॉल तिकिटांचे प्रिंट आऊट काढून विद्यार्थ्यांना वितरित करावी, राज्य मंडळाची सूचना
  • मोठी बातमी: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न? बंगल्याबाहेर बेवारस बॅग सापडल्याने खळबळ
 राजकारण

कोल्हापूरचा 15 वर्षांचा वनवास दूर करत परिवर्तन घडवा; आई अंबाबाईचा अन् लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत- एकनाथ शिंदे

डिजिटल पुणे    11-01-2026 12:13:18

कोल्हापूर: कोल्हापूरकर नागरिकांना काँग्रेसच्या 15 वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत महानगरपालिका निवडणुकीत  परिवर्तन घडवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट जनसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूरच्या अंबाबाईचा आशीर्वाद महायुतीलाच मिळेल आणि पालिकेवर भगवा फडकेल असा निर्धार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कोल्हापूर अनेक कृषी, कुस्ती,सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याचा लौकिक असाच उन्नत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कोल्हापूरच्या आई अंबाबाईचा आणि लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे. त्यामुळेच इथली गर्दी पाहून विरोधकांची बोलती बंद झाली असेल. या सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही नुसती प्रचारसभा नसून विजयाची सभा असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. कोल्हापूरला कुस्तीची परंपरा आहे, इथे माती लावूनच मैदानात उतरावे लागते,महायुतीचे उमेदवार पूर्ण ताकतीने मैदानात उतरले असून विजयश्री खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला. रामाने 14 वर्षाचा वनवास सहन केला होता तर कोल्हापूरकरांनी 15 वर्षांचा काँग्रेस राजवटीचा वनवास सहन केला आहे त्यामुळे आता परिवर्तनाची वेळ आली असून महायुतीला मत देऊन परिवर्तन घडवावे असे आवाहनही एकनाथ शिंदेंनी यावेळी केले. 

तरुणाच्या हाताला इथेच काम मिळावे- एकनाथ शिंदे 

कोल्हापूर अनेक कृषी, कुस्ती,सहकार, शिक्षण या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. त्याचा लौकिक असाच उन्नत ठेवण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. इथल्या तरुणाच्या हाताला इथेच काम मिळावे, यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी फक्त सभेसाठी कोल्हापुरात येत नाही तर जेव्हा महापूर आला तेव्हाही कोल्हापुरात आलो, तेव्हा येथील जनतेचे प्रेम आणि आपुलकीचा अनुभव मी घेतला. त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील जीवास जीव देऊन लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे. त्यामुळे नुसते फेसबुक लाईव्ह करणे आणि फेस टू फेस भेटणे यात फरक असल्याचे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. 

300 कोटींच्या कन्व्हेंशन सेंटरचे काम सुरू- एकनाथ शिंदे 

कोल्हापुरातील नाट्य आणि कला संस्कृती जपण्यासाठी कायम प्राधान्य दिले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग येथील मैदानाचा सुशोभीकरणासाठी 40 कोटी रुपये दिले, जुन्या नाट्यगृहाचे साडे सात कोटींचे काम पूर्ण केले, छत्रपती शाहू महाराजांचे समाधीस्थळासाठी डॉ. आंबेडकर सभागृहाच्या नूतनीकरणासाठी आपण निधी दिलाय, रंकाळा तलावाच्या सुशोभीकरणासाठी 20 कोटी दिले. शिंगणापूर पंपिंग स्टेशनसाठी साडे तीन कोटी दिले,शहरातील १६ मुख्य रस्त्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरासाठी 100 बसेस मंजूर केल्या त्यातील 70 टक्के काम पूर्ण झाले आहे, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर साडे पाच कोटी खर्चून टर्फ तयार केले आहे. महालक्ष्मी मंदिराभोवती 120 आकर्षक विद्युत खांब बसवले, पंचगंगा घाटावर रोषणाई केल्याने कोल्हापूरच्या वैभवात अधिक भर पडली आहे. पालिकेतील 4 हजार कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधला आपण मंजुरी दिली, केएमटी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देऊन सातवा वेतन आयोग लागू केला, तसेच प्रलंबित प्रश्नही मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली. कोल्हापुरातील पूर नियंत्रणासाठी मित्राच्या माध्यमातून 3200 कोटींचा प्रकल्प तयार झाला आहे. 300 कोटींच्या कन्व्हेंशन सेंटरचे काम सुरू आहे. कोल्हापूरच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी रिंग रोड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर चित्रनगरी आद्ययावत करतोय. फाईव्ह स्टार हॉटेल आय टी कंपनी सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापूर नवीन प्रशासकीय इमारत, अमृत 2 योजनेचे पैसे असो कोल्हापूरचे एकही काम पैशांअभावी थांबू देणार नाही अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती