सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी राजकीय घडामोड : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद पवार कुटुंबातच राहणार? सुनेत्रा पवारांच्या नावाची जोरदार चर्चा
  • मोठी बातमी! राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमान अपघाताच्या सीआयडी चौकशीचे आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगानेही तपास
  • जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान; ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी
  • शरद पवारांनी घेतलं अजित पवारांच्या अस्थींचं दर्शन; विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात आजही मोठी गर्दी
 DIGITAL PUNE NEWS

‘सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम

डिजिटल पुणे    07-02-2026 10:46:57

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने ‘ वंदे मातरम सुरक्षित तटम समृद्ध भारतम’  सायक्लोथॉन 2026 उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सीआयएसएफची दोन सायकलिंग पथके एकाच वेळी बक्खली (पश्चिम बंगाल) आणि लखपत (गुजरात) येथून निघाली आहे. हे पथक एकत्रितपणे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर सुमारे ६,५०० किलोमीटरचा प्रवास करणार आहे. ज्यामध्ये ९ किनारी राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असून २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कोची (केरळ) येथे सायक्लॉथॉनचा समारोप होईल. महाराष्ट्रात हे सायकलपटूंचे पथक 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रवास करणार आहे. पालघर जिल्ह्यातील जुचंद्र गावापासून सायकलपटूंच्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. ‘सीआयएसएफ’ चा सायक्लोथॉन उपक्रम राष्ट्रीय जनजागृती आणि जागरूकता आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

यामध्ये सायकलपटूंचे दोन्ही संघ देशातील निसर्गरम्य किनारी मार्गांवरून सायकल चालवतील, प्रमुख बंदर शहरे, मासेमारी गावे आणि ऐतिहासिक स्थळांमधून जातील आणि नंतर कोचीमध्ये त्यांचा प्रवास संपेल. सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन २०२६ उपक्रमाचा उद्देश भारताच्या संपूर्ण किनारपट्टीवर प्रवास करणे आहे. यामध्ये नऊ किनारी राज्ये आणि चार केंद्रशासित प्रदेशांमध्ये  प्रवास समाविष्ट आहे.

‘सीआयएसएफ’ कोस्टल सायक्लोथॉन-२०२६ चे उद्दिष्ट

अमली पदार्थ, शस्त्रे आणि स्फोटकांच्या तस्करीसारख्या धोक्यांबद्दल किनारी समुदायांना संवेदनशील बनविणे आणि दक्षतेला प्रोत्साहन मिळावे, असा आहे. यासह मजबूत किनारी सुरक्षा जाळ्यासाठी किनारी समुदाय आणि सुरक्षा यंत्रणांमधील सहभाग अधिक मजबूत करणे, स्वातंत्र्य सैनिक, शहीद, सुरक्षा कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदानाचा आदर करून वंदे मातरमची भावना जागृत करणे, भारताचा समृद्ध सागरी वारसा, परंपरा, इतिहास याविषयी जनजागृती निर्माण करणे, देशाच्या सागरी समृद्ध वारसामध्ये समुदायांचे, विशेषतः मच्छीमारांचे असलेले अमूल्य योगदान अधोरेखित करणे, तरुणांमध्ये आणि किनारी प्रदेशात वास्तव्यास असलेल्या समुदायांमध्ये, तंदुरुस्ती, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचाही आहे.  या उपक्रमात किनारी प्रदेशात वास्तव्यास असलेल्या समुदायांची  विशेषतः मच्छिमारांची  देशाचे “तट प्रहरी”  म्हणून महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्यात आला आहे.

गाव दत्तक घेऊन समुदायांचा सहभाग

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या सायक्लोथॉनचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे सामुदायिक सहभाग आहे. या प्रवासादरम्यान, सायक्लोथॉन 52 किनारी गावांमध्ये थांबेल, ही गावे सीआयएसएफ दत्तक घेईल. ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी), बंदर प्राधिकरणे आणि इतर सागरी यंत्रणांसारख्या प्रमुख भागधारकांशी समन्वय साधून, स्थानिक सीआयएसएफ सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) उपक्रमांद्वारे समर्थित, समुदाय कल्याण आणि पायाभूत सुविधा विकास उपक्रम हाती घेणार आहेत.  भारताच्या किनारपट्टीजवळ ४७ सीआयएसएफ युनिट्स असल्याने, हे दल या दत्तक घेतलेल्या गावांशी सतत आणि दीर्घकालीन संबंधातून जनजागृती विषयक उपक्रमाची अंमलबजावणी करणार आहे.

सामाजिक जागरूकता आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व युवकांमध्ये पटविण्यात येणार

तरूण आणि सामान्य नागरिकांना राष्ट्र उभारणीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भरती जागरूकता मोहीम, क्रीडा उपक्रम आणि युवा संवाद कार्यक्रम आयोजित केले जातील. युवा पोहोच योजनेत जागरूकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छ भारत मोहीम, वृक्षारोपण मोहीम आणि अंमली पदार्थांचा वापर आणि तस्करीविरुद्ध उपक्रम, किनारी समुदायांमध्ये सामाजिक जागरूकता, स्वच्छता आणि पर्यावरणीय जबाबदारी वाढवणे यांचा समावेश आहे. या उपक्रमातून तरुणांमध्ये सामाजिक जागरूकता आणि पर्यावरणीय जबाबदारीचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे.

महिला सक्षमीकरण आणि समावेशकता

युवा सहभाग आणि महिला सक्षमीकरण हे सायक्लोथॉनचे प्रमुख केंद्रबिंदू आहेत. विशेष म्हणजे, सहभागी सायकलस्वारांपैकी 50 टक्के महिला आहेत, जे राष्ट्रीय सेवा उपक्रमांमध्ये ‘जेंडर इक्वलिटी’  आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकल्याचे निदर्शनास येत आहे. नेतृत्वाखालील सार्वजनिक संवादाद्वारे, सायक्लोथॉन नागरिकांना शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि राष्ट्रसेवेची भावना स्वीकारण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न या उपक्रमामधून करण्यात येणार आहे.

प्रमुख कार्यक्रम आणि लोकसहभाग

सायक्लोथॉनचा कोची येथे समारोप होण्यापूर्वी, मुंबई, गोवा, मंगळुरू, कोणार्क, विशाखापट्टणम आणि चेन्नई येथे होणाऱ्या प्रमुख कार्यक्रमांमध्ये क्रीडा, संस्कृती, चित्रपट उद्योगातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सहभाग असणार आहे. सीआयएसएफ वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉन -२०२६  हा उपक्रम २०४७ च्या विकसित भारताचे प्रतिबिंब दर्शविणारा ठरणार आहे. या उपक्रमातून किनारी प्रदेशांना सुरक्षा विषयक  बळकटी मिळणार असून येथील समुदायांना सक्षम बनवले जात असल्याचा संदेश मिळत आहे.  सतर्क, तंदुरुस्त आणि जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच मदतगार ठरणार आहे.

 

भारताच्या किनारपट्टीवर असलेले रिफायनरीज, शिपयार्ड आणि अणुऊर्जा प्रकल्पांसह ही बंदरे भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाची आहेत. तथापि, त्यांना अमली पदार्थ, शस्त्रे, स्फोटके, घुसखोरी आणि इतर बेकायदेशीर कारवाया यासारख्या सततच्या धोक्यांचा सामना करावा लागतो. मागील पाच दशकांहून अधिकच्या काळापासून सीआयएसएफकडे किनारपट्टीवरील १२ प्रमुख बंदरे आणि इतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉनच्या यशावर आधारित, २०२६ ची आवृत्ती ही ऐतिहासिक ठरणार असून लोक चळवळीच्या रूपात पुढे येत आहे. हा उपक्रम नव्या संकल्पाने आणि मजबूत राष्ट्रीय संबंधाने पुढे नेत आहे.

भारताच्या किनारपट्टीवर २० कोटींहून अधिक लोक राहतात आणि मासेमारी, नौवहन, पर्यटन आणि किनारी संसाधनांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देतात. ‘ ब्लू इकॉनॉमी’ ही आपल्या सागरी परिसंस्थांचे संरक्षण करताना या किनारी संसाधनांचा वापर करण्यासाठी एक शाश्वत दृष्टिकोन दर्शवते.

या सायक्लोथॉनद्वारे सीआयएसएफचे उद्दिष्ट किनारी सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि आपल्या सागरी संसाधनांच्या क्षमतेचे महत्त्व लक्षात आणून देणे आहे.भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नौवहन आणि बंदर सुरक्षा नियमांनुसार सीआयएसएफला मान्यताप्राप्त सुरक्षा संघटनेचा कार्यभार सोपवला आहे. हे सायक्लोथॉन महत्त्वाच्या किनारी प्रतिष्ठानांचे रक्षण करण्याच्या आणि त्यात भारताच्या किनारी समुदायांचे प्राधान्य सुनिश्चित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.

सायक्लोथॉन केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही. हे आपल्या देशाच्या किनारी समुदायांना समर्पित  आहे. शाश्वत किनारी विकासासाठी कृती करण्याचे आवाहन, किनारी सुरक्षेबद्दल जागरूकता आणि आपल्या विविध राष्ट्राला एकत्र बांधणाऱ्या एकतेच्या भावनेचे प्रदर्शन आहे.


 Give Feedback



 जाहिराती