सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टिपू सुलतानाने 75 हजार हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला: देवेंद्र फडणवीस
  • अजितदादांच्या अपघातानंतर एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, व्हीएसआर कंपनीच्या विमानात कोणीच बसणार नाही
  • बारामतीत रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा; डीजीसीए व व्हीएसआर कंपनीविरोधात एफआयआर नोंदवण्यास पोलिसांचा नकार
  • पुण्यात थकीत ई-चलनांवर कडक कारवाई; ३० दिवसांत दंड न भरल्यास ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित होणार
  • मुंबईत पोलिसांनी उडवून लावलं, रोहित पवार-युगेंद्र पवार वकिलांची अख्खी फौज घेऊनच बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले
  • जो गेला तो साधा माणूस नव्हता, महाराष्ट्राचा तारणहार होता, FIR घेतलीच पाहिजे; बारामती पोलीस स्टेशनबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी
 विश्लेषण

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार-पोलिसांमध्ये खडाजंगी; डीजीसीएविरोधात एफआयआर नोंदवण्यास नकार

डिजिटल पुणे    25-02-2026 16:08:25

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी (डीजीसीए) विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आमदार रोहित पवार यांची मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पोलिसांशी तीव्र वादावादी झाली. पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याने हा वाद चिघळला.

रोहित पवार यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी आणि संदीप क्षीरसागर उपस्थित होते. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार ऐकून घेण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले जाते. पवार यांचे जबाब नोंदवण्यासाठी लॅपटॉपही आणण्यात आला. मात्र त्याचवेळी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि एफआयआर नोंदवता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

यावेळी पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. “एफआयआर दाखल करणे हा आमचा अधिकार आहे,” असा पवार यांचा आग्रह होता. त्यावर “ज्याठिकाणी जायचे तिथे जा, पण येथे एफआयआर नोंदवू शकत नाही,” असे उत्तर अधिकाऱ्यांनी दिल्याचा दावा पवार यांनी केला.

दरम्यान, डीजीसीएने व्हीएसआर कंपनीविरोधात कारवाई केल्याचे पत्रक जाहीर केले असून २५ पैकी ५ विमानांवरच कारवाई झाल्याचा आरोप पवार यांनी केला. नव्या पीएनएस कायद्यानुसार हा दखलपात्र गुन्हा ठरू शकतो, असे त्यांचे म्हणणे आहे. “सामान्य प्रकरणांमध्ये तत्काळ एफआयआर होतो, मग या गंभीर प्रकरणात नोंद का होत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी सांगितले की, संबंधित विमानतळ ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो, तेथे ते तक्रार दाखल करण्यासाठी जाणार आहेत. “राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूप्रकरणी न्याय मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी काय अपेक्षा ठेवायची?” असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पुढील कायदेशीर लढ्याचा इशाराही दिला.या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


 Give Feedback



 जाहिराती