सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • टीईटी पेपर फुटी प्रकरण! मंत्री दादा भुसेंनी राजीनामा द्यावा, शिक्षक आमदार जयंत आंसगावकरांची मागणी
  • मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचे सत्र! उद्या होणारी 'टीईटी' परीक्षा रद्द; ठाण्यातून पेपर जप्त, पोलीस ॲक्शन मोडमध्ये
  • टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द; पहिले NEET, आता TET, महाराष्ट्र पुन्हा हादरला
  • सख्ख्या भावाचाही सियाविरोधात जबाब; 'केतनशी लग्न नको' असं कधीच सांगितलं नव्हतं, तपासाला नवं वळण
 DIGITAL PUNE NEWS

‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वात भाऊ कदम का दिसले नाहीत? अखेर कारण आलं समोर

डिजिटल पुणे    05-05-2026 17:01:00

मुंबई : मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा लोकप्रिय कॉमेडी शो चला हवा येऊ द्या पुन्हा नव्या पर्वासह प्रेक्षकांसमोर आला, मात्र यावेळी जुनी लाडकी टीम दिसली नाही. विशेषतः भाऊ कदम आणि निलेश साबळे यांच्या अनुपस्थितीमुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते. आता यामागचं खरं कारण समोर आलं आहे.

एका मुलाखतीत बोलताना भाऊ कदम यांनी स्पष्ट केलं की, शो बंद झाल्यानंतर काही महिन्यांनी नवीन पर्व सुरू होणार असल्याची माहिती मिळाली. मात्र या दरम्यान बराच काळ गेला आणि सतत थांबणं शक्य नव्हतं. याच काळात निलेश साबळे यांनीही नव्या पर्वात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

भाऊ कदम यांनी सांगितलं की, “निलेश साबळे हा या शोचा मुख्य आधार होता. लेखन आणि दिग्दर्शन त्याच्याकडेच होतं. जर तोच नसणार असेल, तर शोची गुणवत्ता टिकवणं कठीण झालं असतं. त्यामुळे मीही या नव्या पर्वासाठी नकार दिला.”त्यांनी पुढे असंही म्हटलं की, “शो करता आला असता, पण पूर्वी जसं दर्जेदार काम झालं, तसंच कायम ठेवणं महत्त्वाचं होतं. दर्जा कमी झाला असता, तर प्रेक्षकांना तीच मजा मिळाली नसती.”दरम्यान, नव्या पर्वात नवीन टीमसोबत शो सादर केला जात असला तरी, जुन्या टीमची उणीव प्रेक्षकांना जाणवत असल्याचं चित्र आहे.


 Give Feedback



 जाहिराती