सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्यातील कोथरूड कथित भोंदू बाबा प्रकरणात मुख्य आरोपी दीपक खडकेचा जामीन पुणे न्यायालयाकडून रद्द
  • दिवंगत पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्यावर कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन ग्राउंड इथं अंत्यसंस्कार सुरू
  • शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र, त्या आधारे निवडणूक आयोग अन् राहुल नार्वेकरांचे निर्णय चुकीचे; ठाकरेंच्या वकिलांचा सडेतोड युक्तिवाद, शिवसेना कुणाची याचा निकाल लवकरच
  • काँग्रेसने सुनेबद्दल इतकं घाणेरडं वक्तव्य केलंय, तरीही शरद पवार शांत का? काँग्रेसची साथ सोडून बाहेर पडा: संजय काकडे
  • मोठी राजकीय घडामोड! रुपाली चाकणकरांनंतर अखेर नवे नेतृत्व; वैशाली नागवडे यांच्याकडे NCP महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा
 विश्लेषण

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला; 'शरद पवारांनी काँग्रेसची साथ सोडावी', संजय काकडेंचा थेट इशारा

डिजिटल पुणे    05-08-2026 16:28:47

पुणे  : सुनेत्रा पवार यांच्याविरोधातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काकडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशा प्रकारचे वक्तव्य झाल्यानंतरही शरद पवार यांनी मौन बाळगल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्यांनी काँग्रेसची साथ सोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडावे, अशी मागणी केली.

बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काकडे म्हणाले की, राजकीय विरोध करताना वैचारिक आणि मुद्देसूद टीका व्हावी. मात्र, वैयक्तिक पातळीवर जाऊन कुटुंबातील महिलांबाबत आक्षेपार्ह भाषा वापरणे कोणत्याही राजकीय संस्कृतीला शोभणारे नाही. संबंधित वक्तव्य करणाऱ्यांवर काँग्रेसने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्वावरही निशाणा साधत, पक्षाने ४८ तासांच्या आत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा महायुतीचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करतील, असा इशारा दिला. सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरू, तसेच काँग्रेसच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने वैशाली नागवडे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. नियुक्तीनंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, ही जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राज्यभर महिलांना पक्षाशी जोडण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वक्तव्याचा निषेध करत नागवडे म्हणाल्या की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा राज्य आहे. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी महिलांविषयी किंवा कुटुंबीयांविषयी अवमानकारक भाषा वापरणे योग्य नाही. सार्वजनिक जीवनात प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

याचबरोबर पक्षातील कार्यकर्त्यांनीही संयम आणि शिस्त पाळावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी संघटनेतील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने पक्षाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी ओळखून काम करावे, असे आवाहन केले. सुनेत्रा पवार प्रकरणावरून आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची भूमिका काय असणार, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


 Give Feedback



 जाहिराती