सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

अखेर २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज केला दाखल ; धनुष अन् ऐश्वर्या रजनीकांतच्या नात्याला ब्रेक

पुजा    08-04-2024 17:35:49

चेन्नई :  अभिनेता धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत यांच्या वाटा आता वेगळ्या झाल्या आहेत. दोघांचं नात आता अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलं आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोन वर्षांपूर्वी धनुषने सोशल मीडियामध्ये पोस्ट करत आपल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता. त्यानंतर त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. जानेवारी २०२२मध्ये धनुषने ऐश्वर्यासोबत वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जगजाहीर केलं होतं. त्यावेळी त्यानं लिहिलेली पोस्टही चांगलीच गाजली होती.

धनुष आणि ऐश्वर्या यांचं २००४मध्ये  लग्न झालं होतं. आता कोर्टात घटस्फोटासाठी धाव घेतल्यानंतर लवकरच कोर्टात त्यांची याचिका सुनावणीसाठी घेतली जाण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून ऐश्वर्या आणि धनुष हे वेगवेगळे राहतात. पण गेल्याच वर्षी ते दोघंही त्यांचा मुलांच्या शाळेच्या एका कार्यक्रमात एकत्र दिसून आले होतं. त्यानंतर त्यांचं नातं पुन्हा बहरल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु ते कामात व्यस्त होते. आता त्यांनी अधिकृतरित्या वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 

दोन वर्षांपासून धनुषने सोशल मीडियात पोस्ट करत आपल्या नात्याबद्दलची भावनिक बाजू मांडली होती. त्यात त्याने आपल्या नातं आता एका अशा टप्प्यावर आलं, जिथे आपला जोडीदार आणि आपला मार्ग वेगवेगळा असल्याचं त्यानं नमूद केलं होतं. १८ वर्षांच्या एकत्र प्रवासात आम्ही मैत्री, पालकत्व आणि एकमेकांचे सोबती म्हणून राहिलो. हा प्रवास समजुतीचा, मोठा करणारा, शिकवणारा असा होता, असंही त्याने म्हटलं होतं. पण आता वेगळं होऊन आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचं ठरवलंय, असंही त्याने यात नमूद केलं होतं. आपण घेतलेल्या या निर्णयाचा तुम्ही सगळ्यांनी आदर करावा, अशी विनंतीही करायला धनुष विसरला नव्हता. 

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांनी २००४ मध्ये लग्न केलं होतं. आठरा वर्षे त्यांनी एकत्रित संसार केला. लग्नावेळी धनुषचं वय २१ वर्षे होतं तर ऐश्वर्याचं वय २३ वर्षे होतं. दोघांना दोन मुलं आहेत. त्यांची नावं यात्रा आणि लिंगा अशी आहेत.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती